सावरकर आम्हाला माफ करा! पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य? ते तर १९४७ लाच मिळालं ना?...
समुद्राच्या अथांगतेला,दूर दिसणाऱ्या क्षितिजाला,आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही,एका भरारीनिशी इतिहास घडवणारा हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो,अन या जन्मीचा तो वीर,क्रांतिवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर…! सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे...
६ फेब्रुवारी १९३२ – कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारोह, पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाने भरलेले उत्साही वातावरण अचानक झाडलेल्या पिस्तुलाच्या आवाजाने दणाणून गेले. समारोहाला आलेल्या एका तरुणीने पिस्तुल चालवलं तेही थेट बंगाल प्रांताचा गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन याच्या वर! यात तो इंग्रज गव्हर्नर तर...
भारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला झालेले विस्मरण हे काही नवीन नाही.त्यातल्या त्यात सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले (का करवले गेलेले?) अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल.स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महापुरुषाची स्वतंत्र भारतात झालेली उपेक्षा पाहता इतर अनेक...